समिश्र

सावधान पालक सुरक्षीत मुलं

सावधान पालक सुरक्षीत मुलं

           अलिकडं कोण कसा निघेल हे काही सांगता येत नाही. आज आदर्शपण उरलेलं नाही. त्यातच स्वार्थ एवढा बळावला आहे की कोणीही समाजसेवा करायला पाहात नाही. मायबापाचं मुलं तेवढंच ऐकतात. जेवढं त्यांना खपतं.
          अलिकडे मुलं एवढी वात्रट झालेली आहेत की ती तसूभरही मायबापाचं ऐकत नाहीत. ती मायबापाच्या तोंडाला तोंड देत असतात. त्यांचं काय करावं तेही सुचत नाही.
          मुलांबाबतीत सांगायचं झाल्यास मुलं वात्रट झालेली आहेत असं म्हणण्यापेक्षा ती वात्रट बनवली गेली आहेत असं म्हणणं जास्त सोयीस्कर होईल. ती कोणं बनवली? या प्रश्नाचा शोध घेतांना एक कारण नक्कीच पुढं येते. ते म्हणजे पालक. पालक आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करीत असतात. त्यांचे सर्वच लाड पुरवीत असतात. ते पालक आपल्या पाल्याचे एवढे लाड करतात की त्यांना कळत नाही की आपला मुलगा वाईट लक्षणाला लागत आहे. मुलांचे होणारे एवढे लाड पाहून मुलं स्वतःच वाईट मार्गाला लागतात. मग त्या मुलांना तेही कळत नाही की त्यांच्या पालकांची स्थिती काय?
          काही काही  पालक हे सुसंपन्न असतात. त्यांची समाजात मोठी इज्जत आणि इभ्रत असते. परंतू ती आपल्या मायबापाची इभ्रत आणि इज्जत मुलांचे अति लाड झाल्यास त्यांना कळते पण वळत नाही. त्यातच अति पैशानं श्रीमंत असलेल्या पालकामुळे अशी मुले गर्वानं दाटतात. त्यांच्या मनात अहंकार वाढीला लागतो. मग गुन्हा घडतो. जो गुन्हा कधीच क्षम्य नसतो.
          अलिकडेच असा प्रकार अभिनेते शाहरुख खानच्या बाबतीत घडला तसेच काही वर्षापुर्वी हाच प्रकार अभिनेते संजय दत्तबाबत घडला. त्या सेलिब्रेटींना त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप आहे. पण तो पश्चाताप केव्हा झाला. घटना होवून झाल्यावर.
           मुळात मुलांबाबत सांगतांना एक गोष्ट आवर्जून मांडतो. ती म्हणजे पालक सावधान तर मुलं सुरक्षीत. पालक जिथे सावधानच नाही तर मुलंही सुरक्षीत असणार नाही. एक घटना सांगतो. ती दिल्लीच्या गाजीयाबाद शहरातील गुडगावची. बरेच दिवस झाले त्या घटनेला. एक मुलगी बोरवेलमध्ये पडली. तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. ऑक्सीजन पुरवलं गेलं. पण ती जेव्हा बाहेर आली. तेव्हा ती मृत पावलेली होती. मुलीचं नाव माही होतं. ज्या दिवशी माही बोरवेलमध्ये पडली. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. मायबाप वाढदिवस साजरा करीत होते. ते आनंदात होते.,अशा आनंदात की त्यांचं मुलीकडेही लक्ष नव्हतं. अशातच लहानगी माही चालत जात जात बोरवेलमध्ये पडली. ती जेव्हा पडली, त्यावेळी अचानक एक व्यक्तीचं तिकडे लक्ष गेलं. म्हणून ती बालिका लक्षात आली व तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. जर या घटनेत पालक सावधान असते तर माही बोरवेलमध्ये पडलीच नसती व तिचा जीवही गेला नसता.
         महत्वपूर्ण गोष्ट ही की आपल्या सभोवताल अशा घटना ब-याच घडत असतात. पण आपण त्या घटनावर दुर्लक्ष करतो. विचार करतो की ती आपली मुलं नाहीत. आपल्याला काय करायचंय. पण ती वेळ आपल्यावरही येते. तेव्हा  वेळ निघून गेलेली असते.
           महत्वाचं म्हणजे आपल्याला सुधारायची संधी वारंवार मिळते. त्यासाठीच अशा घटना घडत असाव्यात. आपण सुधरावे. आपण आपल्या मुलांनाही सुधरवावे. आपण सावधान राहावे. आपण सावधान तर मुले सुरक्षीत. नाहीतर मुलंही वाममार्गाला लागल्याशिवाय राहात नाही.
            आपल्याला माहित आहे की हा काळ धकाधकीचा आहे. महागाई वाढलेली आहे. या वाढत्या महागाईवर मात करायची असेल तर धावपळ केल्याशिवाय जमत नाही. परंतू एक मात्र नक्की की अशा धावपळीच्या जगात काही क्षण मुलांसोबतही घालवावे. लक्ष ठेवावे. जेणेकरुन मुलं बिघडणार नाहीत व त्यांनाही सुरक्षीत ठेवता येईल. हे तितकच सत्य आहे.

        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button