देश

ज्ञानाचा प्रकाश लावणारे हरकेला हजबा यांना सलाम

ज्ञानाचा प्रकाश लावणारे हरकेला हजबा यांना सलाम….

नुकतेच दरबार हॉलमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात देशाचे राष्ट्रपती पद्म पुरस्कारांचे वितरण करत असताना, साध्या पोशाखात, पायात चप्पल नसलेल्या आणि सपाट चेहऱ्याच्या एका व्यक्तीने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आणि राष्ट्रपतीने पद्मश्री प्रदान केल्यानंतर संपूर्ण सभागृह टाळ्यांचा गजर झाला. देशासाठी अनुकरणीय विकासात पुढाकार घेणाऱ्या समाजातील शेवटच्या व्यक्तीला चौथा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे हे आपल्या लोकशाहीचे सौंदर्यच म्हणावे लागेल यात कुठलिही शंका नाही. अतिशय विनम्र पार्श्वभूमीतून आलेल्या, हरेकला हजबाने विलक्षण उत्साहाने कार्य केले आहे जे श्रीमंत लोक आणि स्वयंसेवी संस्था देखील करू शकत नाहीत. त्यांच्या या असामान्य कार्यामुळे ते असामान्य लोकांच्या पंक्तीत उभे आहेत. किंबहुना ज्या व्यक्तीने शाळेचे तोंडही पाहिले नव्हते, त्यांनी संत्री विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून आपल्या गावात शाळा उघडून अशा शेकडो मुलांचे भविष्य घडवले, ज्यांना शाळेत जाण्याची संधीच मिळत नव्हती. त्यांच्या मनात एकच संकल्प होता की त्यांच्या गावातील येणाऱ्या पिढ्यांना निरक्षरतेमुळे ज्या भीषण त्रासाला सामोरे जावे लागले.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून 350 किमी अंतरावर असलेल्या न्यूपडपू गावात राहणाऱ्या हरेकला हजबाला गरिबीमुळे शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. तसे त्याच्या गावात एकही शाळा नव्हती. फळांचे छोटेसे दुकान लावून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. शंभर-दोनशे रुपयांच्या कमाईत तो समाधानी दिसत होता. एके दिवशी ते आपल्या दुकानात संत्री विकत होते. यादरम्यान काही परदेशी पर्यटक त्यांच्या दुकानात आले आणि त्यांनी संत्री आणि संत्र्याबाबत इंग्रजीत विचारणा सुरू केली. शिक्षणाअभावी त्यांना उत्तरे देता आली नाहीत. या घटनेने त्यांचे मन खूप दुखले होते की, मी अनेक वर्षांपासून ज्या फळांची विक्री करत आहे, त्या फळाची किंमत आणि इंग्रजीत फळ कोणते आहे याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. त्यांच्या मनातील तळमळच शाळा उघडण्याच्या ध्यासाचे माध्यम बनली. त्यांच्या मागासलेल्या न्यूपडपू गावात शाळा नव्हती. हरेकला हजबा यांना गावातील मुलांची व्यथा समजली, कारण गावातील सर्व मुले शालेय ज्ञानापासून वंचित होती. अज्ञानामुळे आपल्याला जे काही भोगावे लागले आहे, ते येणाऱ्या पिढ्यांनी सोसावे, असा निर्धार त्यांनी केला. तेव्हाच त्यांनी आपल्या जमा झालेल्या पुंचीतून शाळा सुरू करण्याचा संकल्प केला.

पण शाळा उघडण्याचा हरेकलाचा मार्गही तितका सोपा नव्हता. त्याच्या कडे पुरेशे साधन पैसा फारशा नव्हता. सन 1995 पासून त्यांची मोहीम सुरू झाली आणि 2000 पर्यंत ते आकार घेऊ शकले. सुरुवातीला त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. सुरुवातीला त्यांनी गावातील मदरशाच्या आवारात शाळा उघडली. त्यानंतर केवळ 28 मुलांना घेऊन शिक्षणाचे काम सुरू झाले. त्यानंतर शाळेची स्वतःची इमारत बांधण्याची तयारी सुरू झाली. शाळेतील मुलांनी शेकड्यांची संख्या ओलांडताच इमारतीचे काम सुरू झाले. त्यासाठी त्यांनी कर्जासाठी अर्ज करून ठेवी ठेवल्या. त्याच वेळी, ते त्याच्या वार्षिक कमाईतून त्यात योगदान देत राहिला. त्यानंतर त्याची निःस्वार्थ तळमळ कृती पाहून गावातील काही लोकही जमा झाले. एका स्थानिक वृत्तपत्राने त्यांच्याबद्दल छापले तेव्हा राज्य सरकारने त्यांना एक लाख रुपये मदत म्हणून दिली. त्यानंतर इतर अनेकजण मदतीसाठी पुढे आले. आज त्यांनी बांधलेली शाळा एक एकरात पसरली आहे. पण शाळेसाठी जागा मिळवून त्याला शिक्षण विभागाची मान्यता मिळवून देण्यासाठीही त्यांना खूप संघर्ष करावा लागला . नंतर 1999 मध्ये दक्षिण कन्नड जिल्हा पंचायतीने त्यांच्या शाळेला मान्यता दिली.

आज हरेकला हजबाच्या शाळेत फक्त प्राथमिक स्तरापर्यंतच शिक्षण दिले जाते. गावातील मुलांना उच्च शिक्षणासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी भविष्यात गावात प्री-विद्यापीठ महाविद्यालय सुरू व्हावे, असे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते सतत तयारी करत असतात. आजही ते आपल्या कमाईतून बचत करून पूर्ण रक्कम शाळेसाठी देतात . निरक्षर असूनही शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या हरेकला हजबा यांनी आपल्या गावात शिक्षणाचा दिवा लावला आहे, हे त्याचे कार्य अतुलनीय असून गावातील लोक त्यानां हिरो म्हणून पाहतात. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आता पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांची गणना परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये होऊ लागली आहे.

वास्तविक, हरेकला हजबा यांना पद्मश्री देण्याची घोषणा 25 जानेवारी 2020 रोजीच करण्यात आली होती, परंतु कोरोना महामारीमुळे देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान पुरस्कार वितरण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता त्यांना यंदाच्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हरेकला हजबा यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे, यात शंका नाही. मर्यादित साधनसंपत्ती असूनही त्यांनी ते काम केले जे समृद्ध साधनसंपत्ती असलेल्या व्यक्ती आणि संस्थांनाही करता आले नाही. अतिशय विनम्र पार्श्वभूमीतून आलेले, हरेकला हजबा यांच्या योगदानामुळे त्यांना पद्म पुरस्कार मिळाले. यामुळेच पद्म पुरस्कार मिळालेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींऐवजी संपूर्ण देशाने त्यांच्या सन्मानाला खूप महत्त्व दिले. पुरस्कार मिळताच ते सोशल मीडियात हिरोसारखा उदयास आले आहेत . यामुळेच त्यांच्या परिसरातील लोक त्यांची स्तुती करताना थकत नाहीत, तर हरेकला हजबाचे ध्येय त्यांच्या कार्याचा विस्तार करणे खूप गरजेचे आहे.

विकास परसराम मेश्राम
vikasmeshram04@gmail.com

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button