सामाजिक

बहुजन परंपरेचे महान नायक राष्ट्रसंत गाडगेबाबा !

बहुजन परंपरेचे महान नायक राष्ट्रसंत गाडगेबाबा !

जुनाट जिवघेण्या प्रतिगामी परंपरा आणि दलित-बहुजन परंपरा यांच्यातील संघर्षाचे केंद्र महाराष्ट्र राहिले आहे. जगातील आघाडीचे समाजशास्त्रज्ञ गेल ओमवेट, एलिनॉर जेलियट आणि रोसालिंड ओ’हॅनलॉन यांनी यावर संशोधन केले आहे. गेल ओमवेटची कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी याच विषयावर आहे.

ज्योतिबा फुले हे दलित-बहुंजन सुधारणेच्या परंपरेचे जनक आहेत, तर दलित-बहुजन परंपरा शाहूजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली. गाडगे बाबा हे महाराष्ट्राच्या दलित-बहुजन परंपरेतील महत्त्वाचा दुवा आहेत. गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव , तहसील अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या धोबी जातीच्या गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सखुबाई आणि वडिलांचे नाव झिंगराजी होते.

महाराष्ट्रात जरी ज्योतिबा फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०) आणि सावित्रीबाई फुले (३ जानेवारी १८३१ – १० मार्च १८९७) यांनी यापूर्वीच बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी शाळा उघडल्या होत्या आणि जातीय विरुद्धही संघर्ष केला होता. मनुस्मृती जी अत्यंत अमानविय आहे त्या प्रमाणे इथले भट ब्राम्हण अतिशुद्र-शूद्रांच्या दलित-बहुजना साठी शिक्षणाची दारे बंद झाली होती ती संधी जोतीबा आणि सावित्रीबाई यांनी बहुजन दलित लोकांना दीली . संत गाडगे यांना स्वतः औपचारिक शिक्षणाची संधी मिळाली नाही. जे काही शिक्षण मिळाले ते त्यांनी स्वयंअध्ययनातून केले.

पण फुले दाम्पत्य, साहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे त्यांनाही शिक्षणाचे महत्त्व कळले. जेवणाचे ताट विकावे लागले तरी विकून शिक्षण घ्या, असे ते म्हणाले. हातावर भाकरी घेऊन खाऊ शकतो, पण शिक्षणाशिवाय जीवन अपूर्ण आहे. आपल्या प्रवचनात शिक्षणाचा उपदेश करताना ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एक आदर्श उदाहरण म्हणून मांडत असत, ‘बाबासाहेब आंबेडकरांनी किती कष्टाने शिक्षण घेतले ते वाचा आणि पहा असे ते म्हणत . शिक्षण हा एका वर्गाची मक्तेदारी नसून सर्व तळागाळातील लोकाचा तो हक्क आहे असे ते म्हणत . गरीब समाजातील मुलेही चांगले शिक्षण घेऊन अनेक पदव्या संपादन करू शकतो.’ बाबा गाडगे यांनी समाजात शिक्षणाचा प्रकाश पसरवण्यासाठी 31 शैक्षणिक संस्था आणि इतर शंभरहून अधिक संस्थांची स्थापना केली. नंतर सरकारने या संस्थांच्या देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना केली.
बाबा गाडगे यांचे पूर्ण नाव देविदास डेबूजी झिंगराजी जाडोकर होते. घरी त्याचे आई-वडील त्याला प्रेमाने ‘देबूजी’ म्हणत. त्यांचे वडील लहानपणीच वारले. त्यांना त्यांच्या बालपणीचा काळ त्यांच्या मामाच्या घरी घालवावा लागला. धोबी समाज आणि इतर दलित-बहुजनांची खालावलेली परिस्थिती, निरक्षरता आणि गरिबी यांनी त्यांना इतके अस्वस्थ केले की ते आपले कुटुंब सोडून समाजसेवेसाठी बाहेर पडले.

बुद्धाप्रमाणेच त्यांनी सर्व साधनांचा त्याग केला. ते सोबत फक्त मातीचे भांडे आणि झाडू घेऊन जात असत . मातीच्या भांड्यात ते अन्न खात आणि पाणीही पीत त्याला आपण गाडगा म्हणतो आणि यावरुन लोक बाबांना गाडगे महाराज म्हणून प्रसिद्ध झाले त्यामुळे काही लोक त्यांना गाडगे महाराज तर काही लोक गाडगे बाबा म्हणू लागले आणि ते कुठेही गेला तरी आधी झाडूने साफसफाई करायला सुरुवात करायची आणि स्वच्छतेचे महत्त्व आपल्या कीर्तनातून लोकांना सागायंचे .
ते म्हणायचे – सुगंधी फुले भांड्यात ठेवून देवाच्या मूर्तीवर फुले अर्पण करण्यापेक्षा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी आपले कार्य करा. जर तुम्ही भुकेल्या लोकांना भाकर खायला दिली तर तुमचा जन्म सार्थक होईल. त्या पूजेच्या फुलांपेक्षा माझा झाडू चांगला आहे. ते संतांचे वचन सांगायचे. विशेषत: कबीर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे कविता लोकांसमोर मांडत. जातिभेद , दारूबंदी, अस्पृश्यता निवारण, पशुबळी बंदी इत्यादी त्यांच्या कीर्तनाचे विषय असायचे. समाजकार्य आणि लोकसेवा याला आपला धर्म बनविला होता. निरुपयोगी कर्मकांड, मूर्तीपूजा आणि पोकळ परंपरांपासून ते दूर राहिले. गाडगे बाबा जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेला अत्यंत घृणास्पद आहे म्हणायचे. अशा समजुती ब्राह्मणवाद्यांनी आपल्या स्वार्थासाठी निर्माण केल्या आहेत असे त्यांचे मत होते.

एकदा कुठेतरी सामूहिक मेजवानी आयोजित केली होती. महार जातीचे लोकही पंगत जेवायला बसले. त्यांना पाहताच उच्चवर्णीयांनी आरडाओरडा सुरू केला. गाडगेजीही त्याच रांगेत बसले होते. त्यांना खूप वाईट वाटलं. जर तुम्ही या लोकांना तुमच्यासोबत जेवू शकत नसाल तर मी तुमच्यासोबत जेवायला तयार नाही, असे सांगून तो लगेच पंगतवरून उठले . त्यांच्या सामाजिक-सुधारणा कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना त्यागी आणि लोकसेवक म्हणून संबोधले.

संत गाडगे आणि डॉ.आंबेडकर यांचे अतिशय जवळचे नाते होते. दोघेही समकालीन होते आणि एकमेकांच्या कार्याने प्रभावित होते. दोघेही एकमेकांचा खूप आदर करत. या नात्याबाबत डॉ. एम.एल. शहारे, जे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते, ते त्यांच्या ‘यादों के झरोका’ या आत्मचरित्रात लिहितात की, बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबा यांची अनेकदा भेट झाली होती. दोघेही एकमेकांचा खूप आदर करत. बाबासाहेब आणि संत गाडगे बाबा यांनी एकत्र फोटो काढला होता. आजही अशी चित्रे अनेक घरांमध्ये पाहायला मिळतात. संत गाडगे बाबांनी पंढरपूर येथील त्यांचे धर्मशाळा वसतिगृह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दान केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाणानंतर (10 डिसेंबर 1956) 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगे बाबांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या परिनिर्वाणावर संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतरत्र दलित-बहुजनांमध्ये शोककळा पसरली होती. डिसेंबर महिन्यात काही दिवसांतच दलित-बहुजन समाजाने आपली दोन रत्ने गमावली.
१ मे १९८३ रोजी महाराष्ट्र शासनाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना केली. 20 डिसेंबर 1998 रोजी, त्यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने 2001 मध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले.

विकास परसराम मेश्राम
vikasmeshram04@gmail.com

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button