शिक्षण

शिक्षकच करतो राष्ट्राचा विकास!

शिक्षकच करतो देशाचा विकास!

अलिकडे शिक्षणाला फार महत्व आले आहे. परंतू शिक्षकाला तेवढे महत्व आलेले दिसत नाही. जो शिक्षक आपल्या हाडाचं, रक्तामासाचं पाणी करीत विद्यार्थ्यांना शिकवतो. त्या शिक्षकाला लोकं मात्र आज नावबोटं ठेवतांना दिसतात.
पुर्वी शिक्षकाला इज्जत मिळायची. त्यांचा विशेष असा रुतबा होता. त्या काळचे राजेही न्यायदान करतांना आपल्या न्यायदान प्रसंगी अशा शिक्षकांचा सल्ला देत. ते राजे शिक्षक म्हातारे होताच व त्यांना जेव्हा शिकवणं जमायचं नाही. तेव्हा त्यांची पदोन्नती करुन त्यांना दरबारात सल्लागाराची जागा देत. ज्या सल्लागाराला कोणतीच कामं नसायची. ते फक्त आणि फक्त सल्ला देत.
रामायणातील गुरु वशिष्ठाचा उल्लेख इथे आवर्जून करतो. त्यांनीच तरुणपणात रामासह त्याच्या तीनही भावंडांना शिकवलं व अंतिम समयी त्याला अयोध्येचा सल्लागार बनवलं गेलं. द्रोणाचंही कृपाचार्यचंही तेच झालं तसेच चाणक्याचंही तेच. चंद्रगुप्त राजा बनताच त्यानं चाणक्याच्या नीतीनुसारच राज्य केलं.
यामध्ये विशेष बाब अशी की ज्या राज्याचा सल्लागार चांगला असायचा. ते राज्य विकासात अग्रेसर राहिलं आणि ज्या राज्याचा सल्लागार चांगला नसायचा. ते राज्य लयास गेलं. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास महाभारताचं उदाहरण देता येईल. कौरव पांडव असे महाभारतातील दोन गट बरंच काही शिकवून जातात. एकाकडे गुरु द्रोण सल्लागार. ज्याने त्याला गुरु मानणा-या एकलव्याचा अंगठा कापून घेतला होता. ज्याने ध्रृपद राजाला हरवून अर्ध राज्य मागून घेतलं होतं. त्याची बुद्धी कशी असेल हे यावरुन दिसते. हा कौरवाचा सल्लागार होता. तसाच दुसरा कौरवाचा सल्लागार होता शकूनी. ज्याचा शब्द न् शब्द दुर्योधन ऐकायचा. तो जे सांगेल ते सर्व. मग त्या सल्ल्यात तथ्य असायचं असं नाही. अशा दोन गुरुंच्या भरवशावर कौरवांचा कारभार चालत राहिला. त्यातच क्रिष्ण…….विरुद्ध गटाचा सल्लागार अर्थात पांडवांचा सल्लागार. त्यानं अर्जूनाचं सारथीपणंही केलं. यामध्ये त्यानं पांडवांना चांगलेच सल्ले दिले. त्याची परीयंती अशी झाली की कौरव संपले. परंतू पांडव तरले आणि पुढे हस्तीनापूरच्या राजगादीवर विराजमान झाले.
आजही आपण चोल, चंदेल, राष्ट्रकुट, पल्लव, मगध, गुप्त, वर्धन यांचे राज्य पाहतो. ती राज्य त्यांच्या त्यांच्या काळात भरभराटीस होती. त्याचे कारण त्यांचे त्यावेळचे सल्लागार. जे सल्लागार त्यांच्या पुर्वाश्रमीच्या आयुष्यात शिक्षकच होते. हळूहळू काळ बदलला व राजे सल्लागार म्हणून कालांतरानं शिक्षक नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती करु लागले.
आपण सगळे अकबर बिरबलाच्या कथा आवडीने वाचतो. अकबर कोण होता व बिरबल कोण होता हे सर्वांनाच माहित आहे. तसेच क्रृष्णदेवराय व तेनालीरामही आपल्याला माहित आहे. त्यातच पेशवे आणि फडणवीस. ही सर्व राजघराणी. त्यांनी या देशातील राज्यात बरेच दिवस राज्य केलं. त्याचं कारण म्हणजे त्यांचे सल्लागार. जे चाणाक्ष होते आणि ते शिक्षकामधून आले होते.
आजही शिक्षकांना तेवढं ज्ञान आहे. हा शिक्षक वेळप्रसंगी आजही आपल्या स्वतःसाठी जगत नाही तर तो आजही दुस-यांसाठीच जगतो. परंतू त्याच्या जगण्याला आजही किंमत नाही. खरा आदर्श शिक्षक हा आपली मुलं हुशार बनविण्याऐवजी आपल्या विद्यार्थ्यांना हुशार बनविण्यासाठी अपार मेहनत घेत असतात. शिक्षक जर नसते तर आज कोणीही डॉक्टर, इंजीनियर बनू शकले नसते. त्यातच न्यायदान करणारे न्यायाधीशही एवढंच नाही तर देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही कोणी बनू शकले नसते.
वरील सर्व घटक जे कोणी बनवतात. ते घटक बनविणारा शिक्षक. आज त्या शिक्षकाचीच हेळसांड होतांना दिसत आहे. वास्तविकता अशी आहे की आज शिक्षणाला महत्व आलं आहे. परंतू शिक्षकाला नाही.
शिक्षक असं व्यक्तीमत्व की ज्यानं या कोरोनाच्या संकटकाळातही स्वतःला सुरक्षीत ठेवलं नाही. त्याने शासन म्हणेल त्या त्या ठिकाणी नोक-या केल्या. कधी पेट्रोल पंपावर तर कधी नाक्यावर. कोरोनाच्या या संकटकाळात देशाला उभारी देण्याचेही कार्य याच शिक्षकाने केले. एवढेच नाही तर आपला जीव धोक्यात घालून या शिक्षकाने विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी जावू जावू शिकवले. हं, मानतो की या कोरोनामध्ये विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतू तरीही ते होवू नये म्हणून शिक्षकांनी ऑनलाइन अभ्यास पाठवला. तसेच त्यासाठी त्यांनी त्यांनी यु ट्यूब, गुरुमाऊली, दिक्षा तसेच इतरत्र शोधून वा स्वतः मेहनत करुन व्हिडीओ बनवलेत व ते व्हाट्सअपच्या माध्यमातून पाठवले.
या काळात शिक्षकांनी तोलामोलाची कामगीरी केली. हं, लुटलं कोणी तर मोबाइल कंपन्यांनी. त्यांनी मुलं अभ्यास करतात म्हणून याच काळात नेट शुल्क कमी करायला हवं होतं वा माफ करायला हवं होतं. परंतू त्या कंपन्यांनी ते शुल्क माफ केले नाही. उलट त्यात वाढ केली. त्यामुळं आधीच लाकडाऊनमुळं बेरोजगार ठरलेली माणसं त्यातच मोबाईल कंपन्यांचं वाढलेलं शुल्क. त्यामुळे तर विद्यार्थी वर्ग सुरक्षीत नाही. त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होणारच.
त्यामध्ये लोकं त्या मोबाईल कंपन्यांना जबाबदार पकडणार नाही. जबाबदार इथेही शिक्षकच पकडला जातो आणि त्याचेवरच ताशेरे ओढले जातात.
महत्वपूर्ण वस्तुस्थिती अशी की ज्या देशाचे शिक्षक आदर्श असतील. तो देश आदर्श म्हणून गणला जातो. तसेच विशेष सांगायचं म्हणजे ज्या देशाच्या प्राथमीक विभागाच्या शाळा चांगल्या असतील. त्या शाळा दर्जेदार शिकवीत असतील तर तो देशही विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर जातो. कारण योग्य नागरीकत्वाचे बाळकडू हे प्राथमीक शाळेतच मिळत असते. जे बाळकडू इतरत्र मिळत नाही. ज्याप्रमाणे बाळाचा किंवा प्राण्यांचा जन्म होताच आईच्या वा प्राण्यांच्या पहिल्या दुधात जी प्रतिकारशक्ती असते. ते दूध प्राशन केल्यानं जगातील कोणतेच आजार आपल्याला बळावत नसतात. अलिकडे तेही पाजत नाही. तर ते शुद्ध नाही म्हणून फेकून देतात. तीच स्थिती अगदी प्राथमीक वर्ग शिकणा-या बाळाची असते. प्राथमीक वर्ग म्हणजे आईचं पहिलं दूध असतं. तिथे जन्म देणारी आई असते. इथे शिक्षणरुपी आई असते. पण त्याच शिक्षणरुपी आईचं शिक्षणरुपी दूध पेल्यास वा प्राशन केल्यास जगात कोणालाही घाबरावं लागत नाही.
मुळात शिक्षक हा सल्लागार बनण्यालायकच असतो. कारण त्याला फार मोठे शिकविण्याचेच नाही तर आयुष्यातील अनुभव असतात. त्यांचा सन्मान हा आपला सन्मान असतो. त्याचा अपमान आपला अपमान असतो. म्हणून शिक्षकांचा आदर करावा. त्यास सन्मान द्यावा. जेणेकरुन आपला तर विकास होईलच. व्यतिरीक्त आपल्या विद्यार्थ्यांचाही होईल. त्याचबरोबर आपल्या देशाचाही होईल यात काही शंका नाही. कारण शिक्षकच देशाचा विकास करतो. तोच नसेल तर देशातील लोकं शिकू शकणार नाही व त्यातून कोणीच खासदार आमदार तसेच पंतप्रधान, राष्ट्रपती बनू शकणार नाही आणि ते जर नसतील तर देशाचाही विकास होणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button